Sunday, December 25, 2011

लेक्चर मध्ये न करण्याच्या गोष्टी...........

>लिहून घेऊ नये
लेक्चर चालू असताना लिहून कधीच घेऊ नये कारण,नंतर वही पुर्ण करताना पाहून घरातल्यांना व शिक्षकांना वाटतं की पोरगा अभ्यासाला लागला म्हणून .

> लक्षं कधीच देऊ नये
लेक्चर चालु असताना लक्ष कधीच देऊ नये कारण टिचरला लेक्चर नंतर डाऊट विचारल्यावर बरं वाटतं

>मोबाईल मध्ये एकटकं पाहू नये
लेक्चर मध्ये मेसेज टाइप करताना किंवा वाचताना एकटकं मोबाईल मध्ये पाहू नये कारण टिचरच्या मनात शंकांचे घोडे दौडू लागतात.

> शांत बसु नये
बोर लेक्चर मध्ये शांत कधीच बसु नये दहा मिनीटांतुन एखादी तरी कमेंट योग्य वेळेस पास करावी कसं आहे ना महोल हसता खेळता असल्यावर मज्जा येते आणि आपलं डिमांड पण वाढतं.

>अभ्यासाची चर्चा करु नये
लेक्चर चालु असताना टिचरशी अभ्यासा व्यतीरिक्त गोष्टींवर चर्चा करावी त्यांची मत जाणून घ्यावी तेवढाच लेक्चर मध्ये टाइम्पास

>अगाऊ पणा करु नये
खडुस टिचरच्या लेक्चरला मोबाईलवर बोलण्याचा किंवा कमेंट पास करण्याचा अगाऊपणा करु नये असे स्टंट ब-याचदा अंगावर येतात व त्याचा खुप त्रास होण्याची शक्यता देखिल असते.

>एकमेकांकडे बघणं टाळावं
लेक्चर चालु असताना आपल्याला बोलण्याचा रोग प्रत्येक मुलामुलींमध्ये दिसतो.
तेव्हा बोलताना एकमेकांकडे पाहू नये. आपण बोलतोय हे टिचरच्या लगेच लक्षात येतं.

>हसू नये
लेक्चर मध्ये कमेंट पास केल्यावर कधीच जोरात हसू नये यव्हाना टिचरच्या डोळ्यात डोळे घालून कधीच पाहू नये. निर्लज्या सारखं मागे वळून पहावं आणि त्याला बळीचा बकरा बनवावं.

>हजेरी घेण्याच्या वेळेत गप्प बसु नये
लेक्चरच्या आधी टिचर हजेरी घेत असताना आपला नंबर झाल्यावर बोलण्यास व दंगा करण्यास सुरुवात करावी त्यामुळे 10 ते 15 मिनीट चांगला टाइम्पास घडू शकतो.

>उलटं बोलणं टाळावं
लेक्चर मध्ये कोणतीही घटना झाल्यास टिचरशी मोठ्या आवाजात किंवा त्यांना उलटं बोलु नये आपल्या इंन्टरनल मार्कस वर त्याचा रागरतन उमटण्याची शक्यता असते. आणि चुकी नसल्यास शांतपणे नम्र होऊन बोलणी करावी.

>वही कधीच बंद करु नये
लेक्चर मध्ये आपली वही कधीच बंद करु नये टिचरला आपण अभ्यास करतोय आपलं लक्षं आहे असे झालेले गैरसमज आपल्यासाठी चांगले असतात.

 

घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही..........!!

घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही
आज मात्र क्षणोक्षणी त्यांचीच आठवण येते........
अन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही

नेहमीच असा वाटायचं कि घरापासून लांब जावं
... थोडसं आयुष्य स्वतः च्या पद्धतीने जगावं
आजही तो दिवस स्मरणात आहे
जेव्हा पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर आलो

नवीन कॉलेज,नवीन मित्र ....,सार काही नवीन होतं
या मायानगरीत मी हरवणार तर नाहीना असच नेहमी भासत होतं

दररोज आईबाबांचा फोन यायचा
अन पहिला प्रश्न हाच असायचा " तिकडे सर्व ठीक आहे ना ?"
मीही फक्त "होय" म्हणायचो अन डोळ्यात आलेले अश्रू चटकन सावरून घ्यायचो
पण माहित नाही आईला कसं काय कळायचं
ती मला लगेच विचारून घ्यायची "तुला काही त्रास तर नाहीना"
मी म्हणायचो छे छे "त्रास"........ नाही माझा जरा घसा बसलाय

मी खोटं बोलतोय हे आईलाही कळायचं फोनवर बोलताना हृदय तिचही गहिवरून यायचं
चटकन मग "बाबा" आईकडून फोन घ्यायचे
अन मला धीर देवून......."इकडे सार काही अगदी व्यवस्थित आहे
तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि स्वतः ची काळजी घे "असं सांगायचे

आज मी घरी अधूनमधून जातो पण पाहुणा म्हणून
अन लगेच परत निघून येतो कॉलेज असतं माझं म्हणून
खरच आता नकोसा झालाय हा एकटेपणा अन हे शिक्षण
नेहमीच घरच्यांची आठवण येते नकोसा वाटतो क्षणक्षण

घराबाहेर टाकलेलं हे पाउल म्हणजे यशसंपन्नतेच शिखर
गाठण्यासाठी केलेली वाटचाल कि शिक्षा हेच मला कळत नाही
खरचं....घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही..........!!