वहीचे शेवटचे पान पहिल्या पानापेक्षा निराळे असते. या दोन पानांत मैलाचे अंतर असते. पहिले पान देखाव्याचे किती किती सोवळे. शेवटला देखावा नाही मनाने पण मोकळे. पहिल्यावर एक सुटसुटीत नाव एकच पत्ता एकच गाव आणि "शेवटच्या पानावर ?"कोणाचेही पत्ते, कोणाचीही नावे शेवटच्या पानाची अनेक गावे.
शेवटच्या परीक्षेचा रिझल्ट लागला का आपल्या वह्या रद्दीची वाट भागतात पण त्यावर आपल ते वर्ष अवलंबून होत कधी कधी आपण ते विसरतो.तीच रद्दीच्या ढिगार्या
आज ही त्या शेवटच्या पानावरची अक्षरे आपल्या मनात जपून ठेवलेल्या शाळा,काँलेजच्या आठवणींना उजाळा देतात.आणि लेक्चर मधल आपल अक्षर बाईंचा शेरा सगळाच कस आपल्या नजरे समोर तो बोलपट धावू लागतो. त्या पानावर नेहमीच असायच्या अबोल पण नकळत व्यक्त झालेल्या भावना,त्यावर लेक्चर मध्ये केलेला टाइमपास नावत्या शिक्षकांच्या तासाला "आपल्या केवडा" कडे टाकलेला कटाक्ष व तिच्यावर लिहिलेली ती मोडकी तोडकी,त ला त भिदाव्लेली चार ओळी देखील त्या पानावरच असायची.
त्या पानावर काढलेल ते बदामाच चित्र त्या खाली केलेली नावांची खोडी..त्या अक्षरांवर कस आख्या वहीचा सार असल्या सारख वाटत कारण वाहिचीई आधीची पान तर फक्त मार्क मिळवायला मदत करायची आणि शेवटच पानावर हीच अक्षरे जीवनात पुढे जाण्या साठी काहीस अबोल संदेश देऊन जायची.
मस्ती करण्यासाठी एकमेकांना कागदाचे बोले फेकून मारण्या साठी याच पानाचे लचके तोडले जायचे.पण या पाने कधीच याची तक्रार दाखून दिली नाही. एकाद्या विषयाची वही आणली नाही तर कोणत्याही वहीच्या शेवटच्या पण पासून नवीन वही मग सालच कस ते उलट उलट लिहित जान.
या शेवटच्या पानावरच्या आठवणीमनाला फार छळतात तर कधी फार आनंद देतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात...कर एकदा मला आमच्या बाईनी फुली गोळा खेळताना पकडल आणि मग काय.शेवटच पान फाडून मुख्याध्यापकाना दाखवायला तेच पान फाडून पुरावा करण्यात आला होता.मार खाला त्याच की वाल नाही पण शेवटच पण फाडल्या मुळे माझ्या नावच पण पण नकळत निघाल होत.पाहिलं आणि शेवटच पान एकच असायचं पण मधल्या स्टेपलर मुळे त्यांच्यात अंतर पडल पहिल्याचा तोरा, भारी डौल
नाही कळायचे शेवटाचे मोल. शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे . हि दोन पण एकच असून त्यात इतक अंतर कस पडल हे मला कधीच समजलाच नाही.वही मध्ये जपावे ते शेवटचे पान कुणीही दावी आपली शान राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,..... .. माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे!
नाही कळायचे शेवटाचे मोल. शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे . हि दोन पण एकच असून त्यात इतक अंतर कस पडल हे मला कधीच समजलाच नाही.वही मध्ये जपावे ते शेवटचे पान कुणीही दावी आपली शान राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,..... .. माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे!
No comments:
Post a Comment