किती वर्षे निघूण
गेली तुला काहीतरी सांगायचं होत...
पण या जिवनात मोठं
होण्याच्या नादात
लहानपणं विसरायचं होतं ...
मला आजही आठवतो तु माझा हात धरुन
काढलेला तो पहिला "शून्य" तेच माझ
पहिलं अक्षरं होत...
आज मी इतका मोठा झालो,कारण
त्या शून्याचं विश्व निर्माण
करण्यासाठी तु तुझ्या रक्ताचं
पाणी केलं होतं ...
शाळेत जाताना तुझा तो मायेचा हात
माझ्या डोक्यावर होता ,
चालताना तुझ्या त्या साडीच्या पदराचा टोक
माझ्या हातात होता ... त्या पदराचं
अस्तित्व आजही हाताला जाणवतं
होतं ...
पण,
आता घरी कोणीतरी आपलं केविलवाणं
वाट
पाहतयं असं कधीच वाटत नव्हतं ...
आजही आठवतं
जेव्हा मी घाबरलो आणि तु
मला तुझ्या त्या मायेच्या कुशीत
घेतलं ...
आज तु नाहीसं म्हणून आज
ह्या डोळ्यांमध्ये दोन थेंबांच
अस्तित्व दाटलं ...
वाटलं हातात पैसा आहे जीवन आहे "लै
भारी"
पण.....
पण.....
"आई , मी तुझ्या विना भिकारी "
No comments:
Post a Comment